आज आपल्या समाजात महाभारतछाप ढेरपोट्या काल्पनिक गणपतीला बुद्धि चा देवता मानले जाते.कारण काय तर, व्यासाने महाभारत सांगितले आणि ढेरपोट्या गणपतीने ते लिहून काढले । काल्पनिक गणपती ची जन्मतारीख कोणती आणि व्यास नेमक त्याच्याच काळात जन्माला आला होता काय याबद्दल कुणालाही काहीच माहीती नाही. काल्पनिक महाभारतछाप ढेरपोट्या गणपती खरोखरच होऊन गेला. की गणव्यवस्थेतल्या 'गणाचा प्रमुख'या अर्थाचे ते फक्त 'पद' होते, याविषयी कुणी सांगू शकत नाही. समजा, व्यास सांगतोय आणि ढेरपोट्या गणपती लिहून काढतोय अशी घटना खरोखरच घडली असेल तर त्या घटनेतून 'गणपती साधा लेखनिक आहे'.एवढेच सिद्ध होते. दुसऱ्याने सांगितलेले त्याने फक्त लिहून काढले. यात "बुद्धिचा देवता"ठरवण्यासारखे किंवा ठरवण्याइतके काय आहे? या घटनेत काल्पनिक गणपतीच्या बुद्धि ची कसला कस लागलय (किंवा उजेड पडलाय) की ज्यामुळे त्याला थेट 'बुद्धिची देवता' या पदावर चढवावे? बुद्धिचे महत्व,बुद्धिचे प्रामाण्य या गोष्ठी बुद्धाशिवाय कोणी सांगितलेल्यात? बुद्धाला ओव्हरटेक (hijack)करण्यासाठी ज्या प्रकारे बुद्धाचे अनेक सद्गुण कान्हा कृष्णा (भगवंत, नरोत्तम, पुरूषोत्तम सर्वज्ञ आणि सिरीपाद सिरी चा अपभ्रंश श्री असा होतो श्री राम श्री कृष्ण) ला चिटकवले गेले, त्याच धर्ती वर बुद्धिची देवता हे मूळ चे बुद्धाचे विशेषण सद्गुण काल्पनिक महाभारतछाप ढेरपोट्या गणपती ला चिटकवण्यात आले, हे लक्षात यायला डोकं फार चालविण्याची आवश्यकता नाही.
" सुखकर्ता दूख:हर्ता वार्ता विघ्नाची" किंवा 'जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती ' यासारख्या रामदासीछाप गणपतीच्या आरत्या जरा बारकाईने अभ्यासल्यास हे सहज लक्षात येते की,हे काव्य बुद्धिस्ट संस्कृतीमधून आयात करण्यात आलेल्या आहे .बुद्धाने 'जगात दु:ख आहे ,या दूख:चे हरण /निवारण करून सुखी-आंनदी व्हावे, त्यासाठी जीवन जगतांना सम्यक् अष्टांगिक मार्ग अनुसरावेत' असे तत्वज्ञान (philosophy) मांडले याची बहूतेकांना कल्पना आहे .बुद्ध हा जगातील पहिला दुख:हर्ता आणि सुखकर्ता होता. पृथ्वीतलावर बुद्धापूर्वी असे विचार (thought)कुणीही मांडलेले नाहीत .हे विचार लोकसंस्कृतित विविध माध्यमातून जिवंत राहीले आणि अगदी अलीकडे याच विचारातून काल्पनिक महाभारतछाप गणपतीची आरती स्फुरली गेली. मंगलमूर्ति या शब्दाबाबतही वेगळे काही घडलेले नाही . "मंगल" म्हणजे हा शब्द इतिहासात फक्त बुद्धतत्वज्ञानातच (Buddha's philosophy) येतो. मंगल, पवित्र, प्रसन्न, निरागस, निर्मळ,नितळ,निखळ असे व्यक्तिमत्व आणि विचार केवळ बुद्धाचेच होते . 'मंगल' म्हणजे बुद्धविचाराचे भावरूप ! कुणाबद्दलही कसलाही कलुषित पणा नाही, पूर्वग्रह नाही, शत्रूबद्दलसुद्धा क्षमाशील दृष्टिकोण,संपूर्ण विश्वाबद्दल अथांग करूणेची आणि नि: सीम प्रेमाची मैत्री पूर्ण शुद्ध मंगल भावना हेच बुद्धाचे आणि बुद्धिइझचे स्वरूप आहे . "मूर्ती" या शब्दाचेही हेच . जगात पहिली मूर्ती बुद्धाचीच बनली. अगदी आजही काश्मीर असो ,भूतान असो ,इराक-इराण-तुर्कस्तान-अफगानिस्तान असो की चीन-जपान असो, तिथे जून्यात जुनी मुर्ती बुद्धाचीच सापडते. त्यामुळे मंगलमूर्ती ही उपमा मूळची बुद्धाचीच आहे ,यात काहीच शंका राहत नाही.(काल्पनिक महाभारतछाप गणपतीची पहली मूर्ती बुद्धकाळानंतर जवळजवळ एक हजार वर्षांनी तयार करण्यात आली ! इ. स.४५० च्या सुमारास ) समाज जीवनातील वैदिकांचे विशेषधिक्कार आणि बहुजनांची पिळवणूक धार्मिक-सांस्कृतिक शोषणाचा त्यांनी चालवलेला पिढीजात उद्योग याला बुद्धाने आव्हान दिल्यामुळे वैदिकांनी बुद्धाचे नामोनिशान मिटवण्याचे प्रयत्न सुरू केले आणि त्यातूनच बुद्धापेक्षा इतर लोक कसे भारी आहेत, तेच कसे मंगलमूर्ती आहेत, सुखकर्ता-दु:खहर्ता आहेत, स्थित प्रज्ञ आहेत, असे दाखवून द्यायला सरुवात केली. सिरीपाद बुद्धाला लपवून आणि काल्पनिक महाभारत रामायण छाप राम, कृष्ण, गणपती यांना पूढे करुन त्यांचे मोठेपण काव्यातून ,आरत्यातून ,श्लोकातून गायले गेले.याच संस्कारांचे अधिराज्य आजच्या समाजावर आहे .हा फार मोठा सांस्कृतिक भ्रष्टाचार (culturel corruption) आहे .
आता आपण मूळ ऐतिहासिक(Historical) गणपती नेमका कोण होता ते पाहू .
गणपती म्हंजे नेमकं कोण होतो ?
गणपतीचे रहस्य.(secret)
बुद्ध म्हणजेच अष्टविनायक आणि "गणपति बाप्पा मोरया" म्हणजे "चन्द्रगुप्त मोरया".........लोकशाही युगामधे देशाचा प्रमुख राष्ट्रपती आहे, तसेच प्राचीन भारतात राजेशाहीमधे गण संस्कृती (Culture) होती. आणि त्या गणांच्या प्रमुखाला गणपती म्हणत. या प्राचीन भारतात एका राजघराण्यात सिद्धार्थ गौतम नावाचा राजकुमार जन्मास आला. तोच पुढे या गण संस्कृतीमध्ये शाक्य गणांचा राजा झाला. कालांतराने सिद्धार्थाने बुद्धत्व प्राप्त केले....।।
आता खरा (ऐतिहासिक Historical) गणपती आणि काल्पनिक ढेरपोट्याछाप गणपती यांमधील फरक समजुन घेउया...
काही चलाख शेंडीवर्णीयांनी ख-या ऐतिहासिक(Historical) गणपतीलाच काल्पनिक गणपति बनविला. बुद्ध हा शाक्य गणांचा राजा (Republic king) होता, म्हणून लोक त्याला गणराज असे म्हणत. त्याने बौद्ध धर्माची स्थापना करून तो शाक्य गणांचा प्रमुख झाला.गणांचा प्रमुख म्हणून लोक बुद्धाला गणांचा पती म्हणजे गणपती असे म्हणत. पण ब्राह्मणांनी ऐतिहासिक(Historical) गणपतीचे ब्राह्मणीकरण केले आणि खोटा ढेरपोट्या काल्पनिक गणपती तयार केला.। बुद्ध जेव्हा लोकांना धर्माचा सन्देश द्यायचे तेंव्हा त्यांच्या सन्देशामधून दोन शब्द निघायचे.. चित्त आणि मळ . चित्त म्हणजे मन (mind) म्हणजे तुमच्या मनातून तृष्णाचा मळ काढून टाका म्हणजे तुम्ही दुक्खा पासुन मुक्त व्हाल असे बुद्ध म्हणायचे. पण शेंडीवर्णीयांनी याचा विपरीतअर्थ लावून काल्पनिक पार्वतिला शरीरातून मळ काढावयास सांगितला आणि त्यापासून एक बालक तयार करावयास सांगितला.तसेच बुद्ध हा नागवंशीय होता. पाली भाषेतला नाग म्हणजे हत्ती. म्हणजे बुद्ध हा हत्ती वंशातला होता...बुद्धांची आई महामाया निद्रस्थ अवस्थेत होती तेंव्हा तिच्या स्वप्नात एक हत्ती येऊन आकाशवाणी करतो की, तुझ्या पोटी राजकुमार जन्मास येणार आहे.याचा अर्थ असा की, हत्ती हा बुद्धाच्या जन्माचे प्रतिक आहे. तसेच हत्ती हा बुद्धाच्या धर्माचे ही प्रतिक आहे. आणि बुद्ध हा हत्ती वंशातला आहे. म्हणून काल्पनिक पार्वतीच्या मुलाला हत्तीचीच मान लावली..उन्दराची किंवा बैलाची मान का नाही लावली...???
अष्टविनायक-जगामद्धे दुक्ख आहे हे सांगणारा सर्वात पहिला बुद्ध होता, आणि दुक्ख नष्ट करण्याचे आठ मार्ग बुद्धानेच सांगितले. प्राचीन भारतात(जंबुद्वीपात) बुद्धाच्या अष्टांग मार्गाने दुक्खनष्ट होते, हे बुद्धानेच सिद्ध (सिद्ध करणाराच सिद्धीविनायक असतो पण त्या शब्दाला सुद्धा यज्ञवंशीयांनी hijack केल आणि उंदीर वर बसणारा सिद्धीविनायक निर्माण केला) prove करुन दाखविले. ज्याने अष्टांग मार्गाचे पालन केले तो दुक्खा पासून मुक्त होऊन कायमचा सुखी झाला.म्हणजे दुक्खाला नष्ट करणारा बुद्ध होता आणि सुख मिळवून देणारा सुद्धा बुद्ध च होता.म्हणून लोक बुद्धाला सुख:कर्ता आणि दु:खकर्ता असे म्हणत. मग यज्ञवंशीयांनी काल्पनिक ढेरपोट्या गणपतीला सुख:कर्ता दुक्खहर्ता असे म्हटले... बुद्धाला अष्टविनायक म्हणजे आठ विनयाने परिपूर्ण अशा नावाने संबोधले जायचे।।
मुक्या प्राण्याची मान यज्ञवंशीयांनी काल्पनिक महाभारतछाप ढेरपोट्या गणपतीला लावली, अशा हिंसाचारातुन जन्मास आलेला काल्पनिक ढेरपोट्या मोदकंखाया गणपति सुख:कर्ता दु:खहर्ता होउ शकतो काय...???
काल्पनिक ढेरपोट्या गणपतीने बुद्धत्व प्राप्त करुन दु:खाला नष्ट करणार्या अष्टांग मार्गाचा शोध (Discovery ) घेतल्याचा पुरावा इतिहास (History) सांगत नाही. मग तरीही काल्पनिक ढेरपोट्याछाप गणपती सुख:कर्ता दु:खहर्ता कसा ...???
बुद्धाने दु:ख नष्ट करण्यासाठी आठ मार्गांचा म्हणजे अष्टांग मार्गांचा अष्टशिलांचा शोध (Discovery) लावला.म्हणजे आठ मार्गांचा नायक म्हणून लोक बुद्धाला अष्टविनायक असे म्हणत. मग जानवेंटाई धूर्णीने काल्पनिक ढेरपोट्याछाप गणपतीला अष्टविनायक असे म्हटले...याचा अर्थ असा की, ऐतिहासिक गणपती हा दूसरा तीसरा कोणी नसून अंजनीसुत बुद्धच आहे....
चिंतामणि ची सुद्धा (लंबोद्दर ज्याच तत्वज्ञान लांबलचक आहे तो लंबोद्दर, निर्वाणीरक्षावी निर्वाण हा शब्द फक्त बुद्ध तत्वज्ञान आढळतो या शब्दांची चोरी करून शेंडीवर्णीयांनी ढेरपोट्याछाप निर्वाणीरक्षावी गणपती निर्माण केला .) चोरी (hijack) करून यज्ञवंशीयांनी काल्पनिक गणपतीला चिंतामणि म्हटलं .(जगाच्या सुखदुःखाघी चिंता करणारा चिंतामणि मणि म्हंजे हिरा म्हणून चिंतामणि सर्वप्रथम तथागत अष्टविनायक बुद्धच होते. )
पण यज्ञवंशीयांनी ऐतिहासिक चिंतामणि (Historical ) बुद्धालाच काल्पनिक गणपती बनवुन बुद्धाचे अस्तित्व नष्ट केले. आणि देवांची निर्मिती करुन स्वत्ताला देवासमान मानून स्वत्ताचे आणि देवाचे श्रेष्ठत्व वाढविले. आणि बहुजन समाजाला गुलाम केले...।।।
पुढे चन्द्रगुप्त मोर्य हा मोर्य वंशाचा गणपती झाला म्हणून ब्राह्मण भाईंनी "गणपती बाप्पा मोर्या" अश्या घोषणा दिल्या. ......
मोर्या शब्दाबद्दल आजही भारतीय समजामधे संभ्रम आहे ....... कर्नाटक मधे चन्द्रगुप्त मोर्य ने जैन धर्माचा प्रचार केला म्हणून त्या क्षेत्रामध्ये बरच लोक स्वताच्या नावा पुढे मोर्या शब्द लावायचे .... महाराष्ट्रामधील मोरे आडनाव सुद्धा मोर्य वंशाचे अपभ्रंश आहे ...... संत तुकाराम हे मोरे होते.....१४ व्या शतकात एक मोर्या गोसावी च्या नावावर मोरया शब्द जोडले गेले अशी थाप जानवेंटाईनीं मारली ।
शेंडीवर्णीयांनी तुकाराम महाराजांची आणि पेशव्यांनी शिवाजी महाराजांची हत्या घडवून आणल्या नंतर .......बौद्ध लेण्या आणि विहारांचे ठिकाण काबिज करून तिथे काल्पनिक देवी देवता बसवीणे सुरु केले....... कार्ल्याच्या बुद्ध लेणीत बुद्ध माता महामाये ला ब्राह्मणी एकविरा देवीचे स्वरुप दिले, जुन्नर च्या लेण्याद्री बुद्धलेणीत काल्पनिक गणपति बसवून त्याला काल्पनिक अष्टविनायक आठ गणपतीचे प्रमुख ठिकाण केले, शेलारवाडी, पुणे च्या लेणीत शिवलिंग बसवून ठाण मांडले ..........
कारण...
खरा इतिहास असा आहे की, प्राचीन भारत हा बौद्धमय होता. अशोक सम्राटने बुद्धानंतर संपूर्ण भारत बौद्धमय केला होता. पण यज्ञवंशी ब्राह्मणांनी अशोकाचा वंश संपवून अशोकाला बळी केलं आणि बौद्ध धर्मात विचारांची भेसळ केली. आणि ब्राह्मणभाईंनी 33 कोटी देवांना जन्म दिला. या भारत देशाचे खरेखुरे शाक्य गणांचे गणपति होउन गेले, त्याच गणपति शब्दाचे रामायणछापवाल्यांनी ब्राह्मणीकरण करुण समाजात खोट्या ढेरपोट्या गणपतीला जन्म दिला. आणि काल्पनिक ढेरपोट्याछाप गणपतीच्या नावावर सम्पूर्ण बहुजन समाजाला अंधश्रद्धेत बुडविले. आणि सण उत्सवाच्या नावावर ब्राह्मणांनी या समाजाकडून धन दौलत उकळण्यास सुरुवात केली.
काल्पनिक महाभारतछाप ढेरपोट्या गणपतीची पूजा करुण ब्राह्मण धन दौलत मिळवतात.प्रत्येक सणाला आमचे धन ब्राह्मणभाईंच घेत असतो.
काल्पणिक हत्तीछाप गणपती च्या जन्मासंबंधी आणि एकुणच अस्तित्वासंबंधी काही प्रश्न-
जर शंकर देव होता तर त्याला गणपतीचे शीर धडावेगळे करण्याआधी हे कळाले नाही का की हा आपला पुत्र आहे कि नाही ???
जर हत्तीछाप गणपती देव होता तर त्याला कळाले नाही का की ज्याला आपण अडवतोय हा तर आपला बाप आहे.
शंकराला हे कसे माहित नव्हते कि आपली पत्नी गरोदर आहे..?????
बरे जर पार्वतीने गणपतीला मळापासुन बनवले होते तर ती असे किती दिवस बिना आंघोळीची राहीली कि ज्यामुळे तिच्या शरिरावर इतकामळ साचला होता...?????
गणपतीचे शिर धडावेगळे केल्यावर त्याचे मुंडके जोडण्यासाठी हत्तीचे मुंडके का घ्यावे लागले...????
तेव्हा पार्वतीच्या मळाचा EFFECTचालला नाही का...????
जिवन-मृत्युचे शाप-उःशाप देणर्याशंकराची शक्ती इथे कुठे गेली होती...????
>>कृतयुगात श्रीगणेशाचे वाहन सिंह होते आणि त्याला दहा हात होते...
>>त्रेतायुगात त्याचे वाहन मोर आणि सहा हात...,
>>द्वापारयुगात त्याचे वाहन मूषक म्हणजे उंदीर आणि चार हात होते...
जर प्रत्येक युगात तो स्वतःचे हात स्वतः कमी-जास्त करत होता तर जेव्हा त्याचे मुंडके छाटले गेले तेव्हा त्याने ते स्वतःहुन का नाही निर्माण केले...?
म्हणजे स्वतःच्या मुलाचे प्राण वाचवण्यासाठी शंकर-पार्वतीने एका मुक्या प्राण्याचा जिव घेतला का...? आणि अशा प्राणीहत्येतुन जन्माला आलेल्या काल्पनिक जांवेटाई गणपतीला मंगलमुर्ती, सुखकर्ता म्हणावे तरी कसे...?
शिव पुराणानुसार पर्वतीने बनवलेल्या मळाच्या गोळ्यावर गंगेचे पाणी पडले आणि काल्पनिक ढेरपोट्याचा जन्म झाला...
ब्रम्हवैवर्त पुराणात तर कहरच आहे- पार्वती तो गोळा ब्रम्हदेवाकडे घेऊन जाते आणि तो जिवंत करण्याची विनंती करते, त्यावर ब्रम्हदेव आपल्या विर्याचा शिडकावा मारतात आणि त्या गोळ्याचा काल्पनिक ढेरपोट्याछाप होतो....
>>>मग गणपती शंकराचा की ब्रम्हदेवाचा...?
ढेरपोट्याछाप गणपती विवाहित असून ऋद्धी आणि सिद्धी या ब्रम्हदेवाच्या मुली त्याच्या दोन बायका आहेत म्हणजे ब्रम्हदेवाच्या विर्यापासुन जन्म घेतल्यावर सुद्धा काल्पनिक गणपतीने आपल्याच बहिंनींसोबत कसे काय लग्न केले...?
सौगंधीका परिनया या संगित सुत्राच्या तिसर्या अध्यायात तर गणपतीचा उल्लेख काम-वासनेचा असुरांमधला सहावा असुर असा आहे....
मग अशा ना धड माणुस ना धड जनावर अशा चित्र-विचीत्र CHARACTER ला देव म्हणावे आणि मानावे तरी कसे...?
प्रबोधनकार ठाकरे म्हणतात की ''शंकर हा देवाचा देव असून सुद्धा आणि तीसरा डोळा असून सुद्धा त्याला दिसल किंवा समजल नाही की गणेश हा आपला मुलगा आहे की नाही ते ''
क्रांतीसुर्य,शिक्षणाचे कट्टर पुरस्कार्ते राष्ट्रपिता, महात्मा जोतीराव फुले यांची ढेरपोट्याछाप गणपती वरील रचना**
पशुपरी सोंडपोर मानवाचे !!
सोंग गनोबाचे !!नोंद ग्रंथी !!
बैसे उंदरावरीठेवूनिया बुड !!
फुकितो शेंबूड !!सोंडेतून !!
अन्तेजासी दूर,भटा लाडू देतो !!
नाकाने सोलीतो !!कांदे गणू !!
चिखला तुडवूनीबनविला मोरया !!
केला ढबू-ढेर्या !!भाद्रपदी !!
गनोबाची पूजाभाविका दावितो !!
हरामाच्या खाती !!तूप-पोळ्या !!
जय मंगलमुर्तीजय मंगलमुर्ती !!
गाती नित्य कीर्ती !!टाळ्यासह !!
उत्सवाच्या नावेद्रवे भोन्दाडती !!
वाटी खिरापती !! धूर्त भट !!
जाती मारवाडीगरीबा नाडीती !!
देवूळे बांधती !!कीर्तीसाठी !!
देवाजीच्या नावेजगाला पीडिती !!
अधोगती जाती !!निश्चयाने !!
खरे देव भक़्तदेह कष्टविती !!
पोषण करिती !!घरच्यांचे !!
अजाणसी ज्ञानपांगल्या अन्नदान !!
हेच बा स्मरण !!निर्मिकाचे !!
भोळा वारकरीत्यास दिली हूल !!
स्मरणांत फळ !!आहे म्हणे !!
क्षत्रिय रामाचाधूर्त बने दास !!
गांठी शिवाजीस !!मतलबी !!
दादू कोंडदेवत्या ठेवी अविद्वान !!
करवी तुलादान !!
ऐदि भटा!!
स्वजातीसाठी बोधिले पाखंड !!
धर्मलंड खरे जोती म्हणे !!..
(महात्माफुले समग्र वाङमय)
(आंधळे होऊन विरोध करण्यापेक्षा डोळे उघडे ठेऊन विचार (think) करा आणि तर्क लावा ..)
कारण, विचार हा जरी तुमचा असला तरी त्या विचाराला हायजाक करुण त्याचा पलटवार प्रतिपक्षावर करण्यात शेंडेवर्णीयांचे जुने प्रविन्य आहे याकडे आपण आजुन किती काल दुर्लक्ष करणार आहोत! *तुमच्या भग्गवान चा भगवान करुण त्याला असा काही परिवर्तित केला की, तो गॉड (god) शब्दाचा पर्यायवाचक ठरला, अष्टविनायकाची काय नि अंजनीसुत ची काय तीच गत केली. सिरीपादला श्रीपाद मध्ये परिवर्तित केल . त्याच श्रुख्लेत ना तुमचा सिवमार्ग सुटला , ना महा- देव अशोकाचा हिरावाद निष्प्रभ करण्यासाठी रामाचा सोनावाद प्रसविला, थेरी संघमित्राचा ताम्ब्रपानीवाद पचवून तर त्यानी वट- सवित्रिवादत परिवर्तित केला*. असी एक नव्हे शेकडो उदाहरणे देता येतील.
जो तर्क (स्वस्तिकवादी ) नाही करू शकत तो धर्माथ होय ।
जो तर्क (स्वस्तिकवादी )नाही करू शकत तो मुर्ख होय ।
जो तर्क (स्वस्तिकवादी ) करण्याचे धाडस नाही करत तो गुलाम (भक्त) आहे .-(संसं मासिक मे २०१४)
~
~~~साधुवाद ।
संदर्भ:-
बुद्धिझम मुख्य लोकधारा (संदीप जावळे )
प्राचीन भारतीय संस्कृती आणि सभ्यता (डी. डी. कोसंबी)